शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार हा समाजाचा आरसा : श्रीनिवास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:04 IST

पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या ...

पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या तालुकाध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मनसेचे राज्यसरचिटणीस संदीप देशपांडे, भाजपचे भरत पाटील, सारंग पाटील, परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘पत्रकार समाजाचा डोळा असतो. तो चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देतो. त्याचबरोबर वाईट गोष्टीही समाजासमोर मांडतो. मनोरंजनाबरोबरच दैनिकातून शिक्षण देण्याचे काम केले जाते. वर्तमानातील माहिती आणि भविष्याचे संकेत देण्याचे काम वर्तमानपत्रे करत आहेत.’जयंत पाटील म्हणाले, ‘पत्रकारांना आपल्या मागण्यांसाठी अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत, ही खेदाची बाब आहे. राज्य शासन करत असलेल्या कामातील त्रुटींची माहिती वर्तमानपत्रातून कळते. पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही खेदाची बाब आहे. आजच्या पत्रकाराला विविध दहशतीतून जावे लागत आहे. ’आठ संघांना आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात ‘आमचे प्रश्न आमच्या व्यथा’ यातून ग्रामीण पत्रकांराना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधण्यात आला. आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. शंकर मोहिते यांनी स्वागत केले. शरद काटकर यांनी प्रास्ताविक केले. शरद पाबळे यांनी आभार मानले